खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांची राजमुद्रा, संभाजी ब्रिगेडने भगवली भूक

जीवनावश्यक वस्तूंचे ३५० कीट पुरग्रस्तांसाठी पाठवून मदतीचा हात

अमळनेर(प्रतिनिधी) राजमुद्रा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडने जीवनावश्यक ३५० किट पूरग्रस्त चिपळूण आणि महाड परिसरात पाठवून मदतीचा हात देत भूक भागवली तेथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ते वितरित केले.
कोकण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमूळे अनेक लोकांची संसार उघड्यावर आलें आहेत. त्यामुळे चिपळूण व महाड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यासाठी राजमुद्रा फाऊंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने परिसरातील नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. युवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करत चांगला प्रतिसाद दिला. संकलन करण्यात आलेली मदत एकत्रित करुन ३५० जीवनावश्यक किट तयार करण्यात आले होते.या कार्यात राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्याम पाटील , अनिल बोरसे, विजय चव्हाण, किरण पाटील, किरण सूर्यवंशी, अक्षय चव्हाण , भूषण भदाणे , तेजस पवार , तुषार वायकर , विशाल पाटील , उज्ज्वल मोरे , अक्षय पाटील , निनाद शिसोदे , राज सुर्यवंशी , खिलेश पवार , कुणाल पाटील , किशोर पाटील , सारंग लोहार , राहुल पाटील , गौरव पवार , अमोल पाटील , वरूण बेहेरे , दर्पण वाघ , मयूर पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम देशमुख , आकाश पवार , भावेश जैन , प्रसन्न जैन , भूषण सोनवणे , दिशांत पाटील , उमेश पाटील , सुमित पाटील आदींचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button